औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर कसे झाले ?

  • Home
  • Marathi Blog
  • औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर कसे झाले ?

औरंगाबाद शहर विषयी माहिती

दख्खन चा ताज म्हणून ओळखले जाणारे “बीबी का मकबरा” ५२ दरवाज्यांचे शहर, नहर ए अंबर सारखी अद्भ्युत वास्तू ची ओळख जगाला व अभ्यागतांना दाखवणारी महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी, आपल्या ऐतिहासिक वास्तूचा तुरा देशा बाहेर युनोस्कोने जाहीर केलेल्या वर्ड हेरीटेज साईट मध्ये महाराष्ट्रातील ५ ठिकाणांपेकी २ ठिकाणे 1.अजिंठा व २.वेरूळ लेणी हे देखील छत्रपती संभाजी नगर मध्ये येतात.

ह्या मुळे विदेशी पर्यटकांना विविध ऐतिहासिक वास्तू ची भुरळ घालणारी ठिकाणे देश विदेशातील पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असल्यामुळे पर्यटन व्यवसायास एथे चालना मिळते.

त्याच बरोबर आद्योगिक दृष्ट्या पंचतारांकित शेंद्रा, वाळूज एम आय डी सी सारखे आद्योगिक वसाहती मुळे हे शहर अगदी झपाट्याने विकसित होत आहे.

असणारे महत्वाचे शहर म्हणजेच आजचे छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) ह्या शहराच्या नामांतरणची ऐतिहासिक परंपरा बघणे गरजेचे आहे .

औरंगाबाद चे नवीन नाव होण्यापुर्वी राजतडक-खडकी-फतेहनगर-खुजीस्ता बुनियाद-औरंगाबाद ते सध्याचे छत्रपती संभाजीनगर झालेल्या नामकरणाचा इतिहास. 

इतिहासात पूर्वी सध्याचे छत्रपती संभाजी नगर ला “राजतडक” नाव होते असे म्हंटले जाते.

महाराष्ट्राची निर्मिती बेसोल्ट खडकापासून झालेली आहे त्या मुळे औरंगाबाद शहराचा परिसर हा देखील बेसोल्ट खडकावर स्थिरावला आहे पूर्वी ह्या परिसरात अगदी प्राचीन असे महादेव शिवशंकराचे खडकेश्वर मंदिर आहे ह्याच नावावरून पूर्वी औरंगाबाद शहराला खडकी असे ओळखले जात असे इतिहासकार म्हणतात.

त्या काळी खडकी गावचा विकास राजा मलिक अंबर ने नहर ए अंबर पाणीपुरवठाचा विकास केल्या नंतर खडकी गावाला शहराचे स्वरूप प्राप्त झाले.

१६३३ साली मलिक अंबर राजाचा मुलगा फतेह खान राजा झाल्यानंतर त्याने खडकी शहराचे नाव बदलून “फतेहनगर” असे ठेवले.

काळाच्या ओघात हेही नाव बदलून गेले व शहराला औरंगाबाद असे नाव मिळाले . मराठ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी १६५३ मध्ये औरंगजेब हा डेक्कन विभागाचा सुभेदार म्हणून फतेहनगर मध्ये आला तेव्हा त्याने फतेहनगर चे नाव बदलून “खुजीस्ता बुनियाद” असे ठेवले.

कालांतराने औरंगजेब आजारी पडल्यामुळे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात 1707 मध्ये मृत्यू झाला.औरंगजेबाच्या मुलाने त्यांची कबर त्यांचे गुरू सैय्यद झैनुद्दीन सिराजी ह्यांच्या शेजारी असावी अशी त्यांची इच्छा असल्याकारणाने औरंगाबाद च्या खुलताबाद येथे त्यांची कबर बनवण्यात आली.

औरंगजेबाच्या मृत्यू नंतर शहराला औरंगाबाद असे नाव प्रचलित झाले असावे असा काही इतिहासकार वर्ग  गट म्हणतो .

औरंगाबाद चे नवीन नाव छत्रपती संभाजी नगर कसे झाले ?

छत्रपती संभाजी राजांचा औरंगजेबाच्या कैदेत असतांना ११ मार्च १६८९ रोजी मृत्यू झाला. तेव्हांपासून मराठा समाजाने औरंगाबाद जिल्ह्याचे नाव हे संभाजी नगर करावे अशी मागणी वारंवार केली.

माजी मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असतांना २२ जून २०२२ रोजी औरंगाबाद शहराचे नाव संभाजी नगर करण्यास मंजुरी दिली त्यानंतर १६ जुलै २०२२ रोजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर औरंगाबाद चे नाव हे “छत्रपती संभाजीनगर “ करण्यात येईल असे जाहीर केले.

२४ फेब्रुवारी २०२३ रोजी माननीय नरेंद्र मोदी सरकारने ह्या निर्णयास मान्यता देखील दिली.

Read More

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) बघण्याचे नियोजन करा आमच्या सोबत:

महाराष्ट्रातील पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील ऐतिहासिक स्थळांची सैर करण्यासाठी प्रवाशांच्या विशिष्ट गरजा आणि प्राधान्यतेप्रमाणे.

आम्ही एकटे प्रवासी, कुटुंबे आणि सर्व आकारांच्या गटांना सामावून घेणाऱ्या आलिशान सेडानपासून ते प्रशस्त SUV पर्यंत विविध सर्व प्रकारच्या सुव्यवस्थित वाहनांची टैक्सी सेवा प्रदान करतो.

विमानतळ हस्तांतरणापासून ते शहराच्या सहलीपर्यंत आणि त्याही पुढे, आम्ही आमच्या सेवा तुमच्या प्रवासाच्या कार्यक्रमानुसार तयार करतो.

सर्व प्रसिद्ध ऐतिहासीक स्थळांसाठी टैक्सी सेवा देतो. तुम्ही या लेखामध्ये औरंगाबाद ऐतिहासिक शहरात काय प्रसिद्ध आहे? जाणून घ्या ह्या प्रश्नाचे उत्तर खालील उताऱ्या मध्ये :

  • 11. पैठण चे नाथ सागर धरण
  • 12. सोनेरी महल
  • 13. छत्रपती शिवाजी संग्रहालय
  • 14. प्रोजोन मॉल
  • 15. सलीम अली तलाव आणि पक्षी अभयारण्य
  • 16. कैलास मंदिर
  • 17. औरंगजेबाची कबर (खुलताबाद)
  • 18. खंडोबा मंदिर
  • 19. साई टेकडी घाट
  • 20. जैन मंदिर (कचनेर)
  • 21. म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण
  • 22. H२O वॉटर पार्क
  • 23. भांगसी माता गड
  • 24. मलिक अंबर कबर
  • 25. नवसाला पावणारा राजुरेश्वर गणपती
  • 26. लोकुत्तरा महाविहार, (चौका औरंगाबाद)
  • 27. संत एकनाथ महाराज समाधी मंदिर

ह्या पेक्ष्या अधिक स्थळांना भेट देण्यासाठी आम्ही औरंगाबाद शहरातून तुमच्या पोहचण्याच्या स्थळापर्यंत टैक्सी ची सेवा आपणास उपलब्ध करून देतो. अनुभवी आणि एक्स्पर्ट चालकांसोबत आपण ऐतिहासिक पर्यटन नगरीची सैर करा.

अद्विका टैक्सी ला आत्ताच बुक करा आणि आपले औरंगाबाद शहर किवा त्या बाहेरील स्थळांना भेट द्या . चला मग कळवा तुमचा ट्रीप चा प्लान अद्विका टैक्सी ला 9359604272 वर कॉल करून.

    Comments are closed